शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

अण्णासाहेब पाटील महामंडळ व्याजच देणार : शासनाचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 01:18 IST

कोल्हापूर : राज्यात मराठा समाजाचे मोर्चे निघाल्यानंतर शासनाने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या कर्ज योजनांची पुनर्रचना

ठळक मुद्देनव्या तीन कर्जयोजनांचे निकष जाहीरलाभार्थी तरुणांची मूळ मागणी ही ‘हे कर्ज महामंडळानेच आपल्या निधीतून द्यावे,

विश्वास पाटील ।कोल्हापूर : राज्यात मराठा समाजाचे मोर्चे निघाल्यानंतर शासनाने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या कर्ज योजनांची पुनर्रचना केली असून, प्रत्येकी किमान १० लाख रुपये कर्ज देणाºया तीन नव्या योजना जाहीर केल्या आहेत. शासनाच्या वतीने मंगळवारी त्यासंबंधीचा आदेश काढण्यात आला.

पूर्वीची बीज भांडवल योजनाच रद्द करण्यात आली असून, नव्या तिन्ही योजनांचे कर्ज राष्ट्रीयीकृत बँकांकडूनच घ्यावे लागणार आहे. महामंडळ फक्त त्याचे व्याज दरमहा लाभार्थ्यांच्या नावांवर भरणार आहे. त्यामुळे या योजनेचे स्वरूप कर्ज नव्हे, तर व्याज योजना असे राहणार आहे.

या महामंडळाच्या योजनांचा मराठा समाजातील तरुणांना काहीच लाभ होत नसल्याच्या तक्रारी राज्यभर होत्या.‘लोकमत’ने त्यासंबंधीची वृत्तमालिकाही प्रसिद्ध केली. त्यानंतर शासनाने कर्ज योजनेतील उत्पन्नाची अट सहा लाखांपर्यंत केली; परंतु तरीही कर्जासाठी तरुण या महामंडळाकडे फिरकले नाहीत; म्हणून शासनाने महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उपसमिती नेमून कर्जयोजनांचा फेरविचार केला व नव्या तीन योजना जाहीर केल्या आहेत.

लाभार्थी तरुणांची मूळ मागणी ही ‘हे कर्ज महामंडळानेच आपल्या निधीतून द्यावे,’ अशी होती; कारण राष्ट्रीयीकृत बँका बेरोजगार तरुणांना दारात उभ्या करून घेत नाहीत. अन्य समाजासाठी महामंडळे स्वनिधीतून कर्ज योजना राबवितात..मग याच महामंडळाला तेवढे राष्ट्रीयीकृत बँकांच्या गळ्यात का बांधता? अशी विचारणा होत होती; परंतु शासनाने त्याची दखल घेतलेली नाही. यापूर्वीही गट कर्ज योजनेस १० लाख रुपये मिळत होते; परंतु त्याचा लाभ घेण्यास फारसे कोणी पुढे येत नव्हते. आताही योजनेचे निकष व तिचे स्वरूप पाहता तिला कितपत प्रतिसाद मिळतो याबद्दल साशंकताच जास्त आहे.नव्या योजना अशावैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना : लाभार्थ्यास १० लाखांपर्यंतच्या कर्जाचे व्याज हप्ते नियमित भरल्यास महामंडळ देणार.(व्याजदर १२ टक्के मर्यादा)गट कर्ज व्याज परतावा योजना : १० ते ५० लाखांपर्यंतचे कर्ज मिळणार. त्यावरील व्याज ५ वर्षे देणार. कर्ज १५ लाखांपर्यंत असेल तर व्याजाची रक्कम दरमहा देणारगट प्रकल्प कर्ज : शेतकरी उत्पादक गटांना १० लाखांपर्यंतचे कर्ज बिनव्याजी मिळणार.